पुणे-मुंबई बसमध्ये पहिली भेट, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न, अशी आहे डॉ. गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट

Date:

- Advertisement -


Dr. Girish oak and Pallavi oak lovestory: ‘आम्ही सारे खवय्ये’ या शोचा नवीन सीझन नुकताच सुरू झालाय. या शोमध्ये सध्या सेलिब्रिटी कपल हजेरी लावताना दिसत आहेत. आता डॉ.गिरीश ओक आणि त्यांची पत्नी पल्लवी ओक यांनी हजेरी लावली होती.

Dr. Girish oak and Pallavi oak lovestory
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: अभिनेते डॉ. गिरीश ओक सध्या बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटामुळं चर्चेत आले आहेत. याच निमित्तानं त्यांच्या लग्नाची, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होताना दिसतेय. डॉ.गिरीश ओक आणि त्यांची पत्नी पल्लवी ओक यांनी नुकतीच ‘आम्ही सारे खवय्ये’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणी, किस्से शेअर केले.तसंच त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्साही त्यांनी सांगितला.

बसमध्ये झालेली पहिली भेट
तर गिरीश आणि पल्लवी यांची पहिली भेट ही बसमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं.पल्लवी ओक यांनी सांगितलं की, आम्ही पुणे – मुंबई असा प्रवास करत होतो . मी आधीच बसमध्ये बसलेले होते आणि कर्वे रोडला गिरीश आला. मी त्याला पाहिलं तेव्हा म्हटलं की,अभिनेते डॉ. गिरीश ओक बसने वगैरे कसा प्रवास करतायत. मी नंतर माझ्या एका मैत्रिणीलाही फोन केला, तिला सांगितलं माझ्या बसमध्ये गिरीश ओक आहे, तिलाही आश्चर्यच वाटलं.

Maharashtra Timesमाझ्यात रंग ना रूप, पैसा -नोकरी नाही… का म्हणून पसंत केलं मला ? कुशलचा बायकोला प्रश्न, सुनयनानं दिलं असं उत्तर की…
बसमधल्या जागांची आदलाबदल झाली अन् आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो. मुंबईत वांद्र्यात आल्यानंतर माहिती नाही, पण मी त्याला म्हटलं की, मला तुमचा फोन नंबर मिळेल का? आणि त्यानं नंबर दिला मला…
लग्नाला होता विरोध
तर आमचं लग्न नाट्यमयरीतीनं झालं होतं, असं पल्लवी यांनी सांगितलं. पल्लवी यांच्या आई-वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळं तेव्हा विरोधात जात लग्न केल्याचं गिरीश ओक यांनी सांगितलं.

डॉ.गिरीश ओक यांच्याबद्दल..
तर डॉ.गिरीश ओक हे मूळचे नागपूरकर आहेत. अभिनेते, कवी, लेखक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्टरकीची डिग्री घेतली. काही वर्ष प्रॅक्टीस केल्यानंतर त्यांनी अभिनयाचा मार्ग निवडला. मालिका, नाटकांमधून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. पद्मश्री पाठक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना गिरीजा ही मुलगी झाली. परंतु काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री यांचा घटस्फोट झाला. गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतर २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांना दुर्गा नावाची मुलगी आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. गेल्या आठ वर्षांपासून मटा ऑनलाइच्या टीममध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केल्याचा अनुभव.

घडणाऱ्या घडामोंडींसोबतच लाइफस्टाइल, टेक ,ऑटो, मनोरंजन अशा वेगवेगळ्या विषयांवरील बातम्यांच्या लिखाणाची आवड. लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यात हातखंडा.

कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील तीन पुरस्कारानं गौरव. SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन.”… आणखी वाचा